अटक केलेल्यांत 10 अल्पवयीन
पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप
दोन मनोरुग्ण मुलांना सोडले
नवी दिल्ली : सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात शुक्रवारी संद्याकाळी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. यावेळी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचे नातेवाईक येथील दरीयागंज पोलिस ठाण्याबाहेर ठाण मांडून बसले आहेत.
याबाबत वकीलांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या निवेदनात 50 हून अधिक जणांना तीन तासांपेक्षा अधिक काळ डांबून ठेवण्यात आले. त्यात 10 अल्पवयीन मुलांचा समावेश होता. यातील बहुतांशी मुले जखमी झाली आहेत. सोडलेल्या दोन अल्पवयीन मुलांना गंभीर जखमा झाल्या आहेत. शनिवारी आणखी 19 मुलांची सुटका करण्यात आली नव्हती.
त्यातील अनेक जणांना पोलिसांनी जय श्रीराम म्हणायला लावले. त्यांना त्यांच्या घरातून पकडण्यात आले होते. सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे आमिष दाखवून उचलण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. सोडलेली दोन मुले मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे.