मुंबई: सोमवारी लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकाला विरोधी पक्षाकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. परंतु विधानसभे नंतर भाजपसोबत काडीमोड घेतलेल्या शिवसेनेने या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे नागरिकत्व सुधारणा कायद्याचे पडसाद महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटू लागले आहेत.
Voice of dissent will only keep #democracy safe
anybody who tries to silence the voice of dissent is a threat to #democracy #CABProtests— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 17, 2019
दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या कायद्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या CAA वर टीका केली आहे. ‘हा कायदा माझ्या जातीविरोधात आहे. मी ज्या वंजारा समाजातून येतो, त्यातील अनेकजण मजुराची कामं करतात. अनेक महिलांना शेतातच मुलं होतात. त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्र नसतात. त्यांनी काय करायचं?’ असा प्रश्न करत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या नागरिकत्व सुधारणा कायद्या वर टीका केली आहे.