मुंबई: मुंबईतील बहुचर्चित “शिवस्मारका’च्या निविदा प्रक्रियेसाठी फडणवीस सरकारने केलेला कारभार पारदर्शक नसल्याचा ठपका “कॅग’च्या अहवालात ठेवण्यात आला आहे. एप्रिल-मे 2019 या कालावधीत “कॅग’ने केलेल्या शिवस्मारकाच्या कामाच्या ऑडिटचा अहवाल ऑक्टोबर महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठवण्यात आला आहे.
दरम्यान,छत्रपती शिवाजी स्मारक याबाबत कोणी घोटाळा केला असेल तर ते निंदाजनक आहे, जो कोणी जबाबदार असेल त्यावर कारवाई करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
यापूर्वी शिवस्मारकाच्या कामात एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप सरकारवर केला होता. या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती.