अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांची मदत जाहीर करण्याची पवारांची मागणी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडीमध्ये आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याच नुकसानीची माहिती शरद पवार यांनी पंतप्रधानांना दिली. तसेच शेतकऱ्यांसाठी मदत लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणीदेखील यावेळी शरद पवारांनी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून जवळपास 45 मिनिटे ही बैठक सुरु होती. यावेळी शरद पवार यांनी महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची माहिती नरेंद्र मोदी यांना दिली असून लवकरात लवकर मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेविषयी अन्य कोणती चर्चा या दोन नेत्यांमध्ये झाली आहे का याविषयी अद्याप काहीही माहिती समोर आली नाही.