पुणे – आंबील ओढ्याला 25 सप्टेंबरला आलेल्या पुरात बाधित झालेली कुटुंबे अद्यापही बेघर असून त्यांचा मुक्काम शाळेतच असल्याची तक्रार काही कार्यकर्त्यांनी केली आहे. पुनर्वसनाबाबत कोणताच निर्णय अद्याप झाला नसल्याचीही त्यांची तक्रार आहे.
ऍड. गणेश सातपुते, धोंडीराम सरवदे, प्रमोद करडे, रतन अडसूळ यांनी याबाबत अतिरिक्त महापालिका आयुक्त, एसआरएचे कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. बाधित 35 कुटुंबांना नवीपेठेतील धर्मवीर संभाजी महाराज विद्यालयात ठेवण्यात आले आहे.
या घटनेला 1 महिना उलटून गेला आहे तरी, ही कुटुंब शाळेतच आहेत, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. कार्यवाही सुरू आहे, तांत्रिक बाबींची पूर्तता सुरू आहे अशी कारणे दिली जात आहेत, असेही तक्रारदारांचे म्हणणे आहे.