प्रियंका गांधी यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तरप्रदेशच्या माजी प्रभारी प्रियंका गांधी वाड्रा यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्ला केला आहे. यावेळी त्यांनी उत्तरप्रदेशच्या शेतकऱ्यांचा आधार घेतल आहे. शेतकऱ्यांचे पैसे घेवून सरकार मित्रांचे खिसे भरत आहे, असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे.
संसद से इंडिया गेट तक दिल्ली के सबसे मशहूर, खूबसूरत, ऐतिहासिक स्थान को “सुंदर” बनाने का एक गुजराती कंपनी को ठेका और सरकार का अनुमानित खर्चा = 12,450 करोड़ रुपए
उप्र के गन्ना किसानों का बकाया = 7,000 करोड़ रुपए
भाजपा सरकार होश खो रही है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 26, 2019
कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि पूर्व उत्तर प्रदेशचे प्रभारी प्रियंका गांधी वड्रा यांनी केंद्र सरकारवर हल्ला केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रात बसलेले भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकऱ्यांच्या पोटावर लाथा मारून आपल्या मित्रांचे खिसे भरत आहेत. उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकबाकी देण्याबाबत प्रियांका गांधी यांनी यावेळी सांगितनले. यासाठी त्यांनी आज सलग दोन ट्विट करत सरकारवर निशाणा साधला.
किसान के पेट पर लात मारकर अपने मित्रों की जेब भर रही है। जिस दिन देश का किसान जागेगा, उस दिन से सावधान….वह दिन आएगा।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 26, 2019
त्यातील पहिल्या ट्विटमध्ये प्रियंका गांधी यांनी संसदेतून इंडिया गेटपर्यंत दिल्लीचे सर्वात प्रसिद्ध, सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाण बनवण्यासाठी सरकारने तब्बल 12 कोटींचा खर्च करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच सरकार एका ठिकाणाला ऐतिहासिक बनवण्यासाठी एवढा खर्च करत आहे. परंतू, उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांची 7 हजार कोटींच्या पैशांची परतफेड करावी असेही त्यांनी म्हटले. तसेच सरकार आपली सदसद्विवेक बुद्धी गमावत असल्याचेही प्रियंका गांधी यांनी केला आहे. तसेच दुसऱ्या ट्विटमध्ये प्रियंका गांधी यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पोटावर लाथा मारून आपल्या मित्रांचे खिसे भरत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच देशातील शेतकरी ज्या दिवशी जागा होईल त्या दिवशी तुम्ही सावध रहा असा इशारादेखील प्रियंका गांधी यांनी सरकारला दिला आहे.