मुंबई : फाळणीच्या काळात महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला भेट दिली होती. स्वयंसेवकांशी संवाद साधला होता. भेदाभेद नसल्याबद्दल आणि शिस्तीबद्दल त्यांनी स्वयंसेवकांचे कौतुकही केले होते, असे सरसंघचालक मोहन भागवत बुधवारी म्हणाले.
शाखेत म्हटल्या जाणाऱ्या एकात्मता स्त्रोत्राच्या अनुषंगाने ते म्हणाले, स्वयंसेवक आजही गांदीजींचे स्मरण प्रात:स्मरणीय वंदनीय म्हणून करतात. गांधीजींनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानाच्या जवळील शाखेला फाळणीच्या दुर्देवी काळात भेट दिली होती. त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला होता. त्याचा वृतांत 27 सप्टेंबर 1947 च्या हरीजनमध्ये छापून आला होता.
गांधीजींनी त्यांच्या वर्ध्यातील आश्रमाजवळील शाखेला भेट दिली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनी आश्रमात जाऊन गांधीजीशी संवाद साधला होता, असे त्यांनी रा. स्व. संघाच्या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या लेखात म्हटले आहे.
महात्मा गांधी यांनी स्वदेशीची संकल्पाना राष्ट्राच्या दृष्टीकोनातून स्वीकारली होती. जीवनाच्या सर्व अंगांना व्यापणारा असा हा विचार गांधीजींनी मांडला होता. मात्र, आपल्या गुलामगिरीच्या मानसिकतेने आपण पाश्चिमात्य मुल्यांचा स्वीकार केला, असे त्यांणी या लेखात म्हटले आहे.