पारगाव शिंगवे – आंबेगाव तालुक्यातील शिंगवे (वाडीमळा) येथील तीन शाळकरी मुले मीनानदी मध्ये पोहण्यासाठी गेली असता ती बेपत्ता असल्याची घटना आज (रविवारी) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या मुलांमध्ये दोघे चुलत भाऊ होते.
याबाबत माहिती अशी दहावीच्या वर्गात शिकत असलेला प्रणेय राजेंद्र वाव्हळ (वय 16) तसेच नववीत शिकत असलेले वैभव चिंतामण वाव्हळ (वय 15), श्रेयस सुधीर वाव्हळ (वय 15) हे सख्खे चुलत भाऊ दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी आली होती. वाडीमळा येथील गोविंद दादाभाऊ वाव्हळ हे नदीच्या काडी असलेल्या शेताकडे जात असताना त्यांना सायकल व नदी पात्रात मुलांची कपडे दिसली. ही सर्व माहिती गोविंद वाव्हळ यांनी मुलांच्या घरी कळविली.
सायंकाळी सहा वाजता सर्व ग्रामस्थ नदीकाठी आले व नदीपात्रात शोध घेऊ लागले. रात्रीची वेळ असलेल्या शोध घेण्यात अडचण येत होती. घटनास्थळी तहसीलदार रमा जोशी व मंचर पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी भेट दिली असून एनडीआरफच्या पथकाला पाचारण करण्यात येत आहे.