भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे पितृपक्ष होय. अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन झाले की दोनच दिवसांनी, म्हणजे भाद्रपद वद्य (कृष्ण) प्रतिपदेपासून पितृपक्ष सुरू होतो, तो अमावास्येपर्यंतचा पंधरवडा हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. या काळात आपल्या दिवंगत पितरांचे स्मरण करणे विहित असल्याने या काळात शुभकार्ये न करण्याची हिंदू धर्मात प्रथा आहे. याला “महालय’ असेही म्हणतात. ज्या तिथीला आपल्या पित्याचा मृत्यू झाला असेल, त्या तिथीला त्यांचे या काळात श्राद्ध करतात. पितृपक्षाच्या काळात आपले पितर (म्हणजे त्यांचे आत्मे) यमलोकातून आपल्या घरी वास्तव्यासाठी येतात अशी समजूत आहे. त्या तिथीला आपल्या गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्व पितरांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. भाद्रपद महिन्यातील अमावस्येला “सर्वपित्री अमावास्या’ असे म्हणतात. या दिवशी ज्यांच्या मृत्यूची तिथी माहीत नाही अशा सर्व पितरांचे श्राद्ध करतात.
अश्विनी महामुनी