बंगळुरू: देशभक्त मुस्लीम भाजपाला मतदान करतील, पण पाकिस्तानी समर्थक मात्र भाजपाला मतदान करताना संकोच करतील असे वक्तव्य कर्नाटकमधील भाजप नेते ईश्वरप्पा यांनी केले आहे. ईश्वरप्पा ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आहेत.
अखंड भारत व्हावा ही प्रत्येकाची इच्छा आहे. पण असे होत नाही. कारण त्यांना (काही ठराविक राजकीय नेत्यांना) मुस्लिमांची मतं मिळणार नाही, अशी भीती सतावत आहे. भाजप सत्तेत येण्याआधी आपण कॉंग्रेसच्या काही आमदारांना भेटलो होतो. ज्यांना भाजपात येण्याची इच्छा होती. पण त्यांचा दावा होता की, त्यांच्या विधानसभा मतदारसंघात 50 हजाराहून जास्त मुस्लिम मत असून आपल्याला त्यांना मुकावे लागेल. जर ती मतं मिळाली नाही तर आपल्याला पराभवाचा सामना करावा लागेल, असे त्यांचे म्हणणे होते, असे ईश्वरप्पा यांनी यावेळी सांगितले.
आपल्या मतदारसंघाच 50 हजाराहून जास्त मुस्लीम मतदार असून आपण आजपर्यंत कधीही त्यांच्याकडे मतं मागण्यासाठी गेलो नसल्याचा दावा यावेळी ईश्वरप्पा यांनी केला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीआधी ईश्वरप्पा यांनी भाजपा मुस्लिमांना निवडणूक तिकीट देणार नाही. कारण त्यांचा पक्षावर विश्वास नाही, असे वक्तव्य केले होते.