नवी दिल्ली: स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या (UNHRC) बैठकीत भारताने पाकिस्तानवर हल्लाबोल केला. काश्मीरबाबत पाकिस्तानने केलेल्या आरोपांचे भारताने खंडन केले आणि पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र असल्याचे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगामध्ये जम्मू-काश्मीर ही भारताची अंतर्गत बाब आहे असे भारताने उघडपणे पाकिस्तानला सांगितले.
Secretary (East) MEA, Vijay Thakur Singh at UNHRC in Geneva on Jammu & Kashmir: My Government is taking affirmative action by adopting progressive policies to promote socio-economic equality & justice. pic.twitter.com/MDKZKWKDK7
— ANI (@ANI) September 10, 2019
परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पूर्व) विजय ठाकूर सिंह म्हणाले, “कोणताही देश भारताच्या अंतर्गत कामात हस्तक्षेप करू शकत नाही. अडचणी असूनही जम्मू-काश्मीर प्रशासनाने आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरूच ठेवला आहे”. यापूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी काश्मीरमधील मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप भारतावर केला होता.
नुकत्याच घेण्यात आलेल्या वैधानिक उपाययोजनांनंतर जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील आमच्या नागरिकांना ते पूर्णपणे लागू होईल. हे लैंगिक भेदभाव समाप्त करेल, बाल अधिकारांचे अधिक चांगले संरक्षण करेल आणि शिक्षण, माहिती आणि कार्य हक्कांची अंमलबजावणी करेल, असे देखील विजय ठाकूर सिंह यांनी स्पष्ट केले.