1 लाख 51 हजार 600 क्युसेकने भीमानदीत विसर्ग
भिगवण – खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. या धरणांपैकी खडकवासला धरण 101 टक्के भरले असून 117 टीएमसी पाणी जमा झाल्याने धरणांतून 1 लाख 51 हजार 600 क्युसेकने विसर्ग होत असल्याने हेच पाणी उजनीच्या यशवंतसागर जलाशयाला मिळत आहे.
पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनीवरील सर्व धरणे भरून उजनीत खडकवासला, पानशेत, टेमघर, भामा आसखेड, पवना या धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे उजनी धरण 110 टक्के भरले. पुणे, सोलापूर, नगर आणि उस्मानाबाद आदी जिल्ह्यातील शेतीसह औद्योगिक क्षेत्रासाठी वरदान असणारे उजनी धरण भरल्याने भीमेतून सोलापूरकडे विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
उजनी धरण (यशवंत सागर जलाशय) हे राज्यातील मोठ्या धरणातील एक धरण असून यात 121 टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता आहे.
उजनीतील स्थिती
पाणी जमा झाले : 117.11 टीएमसी
पाण्याची टक्केवारी : 101
भीमेत विसर्ग : 1 लाख 51 हजार 600 क्सुसेक
दौंड येथून विसर्ग : 1 लाख 15 हजार 919
वीजनिर्मिती : 1600 क्सुसेक
मुख्य कालवा : 2500 क्सुसेक
बोगदा : 1200 क्सुसेक