प्रभात’च्या पाठपुराव्याला यश
सातारा, दि.7
खटाव तालुक्यातील पळसगाव, दगडवाडी ते मायणी मार्गे माहूली जाणाऱ्याला रस्त्याला अखेर राज्य शासनाने जिल्हा मार्ग म्हणून मंजूरी दिली. याबाबत प्रभात’ने गेली अनेक दिवस प्रशासनापुढे या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून ठोस भुमीका मांडली होती.
त्याला अखेर आजा यश आल्याने सर्वत्र प्रभात’वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान यासाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास िंशंदे यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता.
त्यांच्या प्रस्तावावरून बांधकाम विभागाने शासनाला कागदपत्रांची पुर्तता जानेवारी 2019 मध्ये केली होती. त्यानंतर राज्य शासनाने पळसगाव, दगडवाडी, मायणीमार्गे माहुली (जि.सांगली) या रस्त्याला दि.7 रोजी जिल्हा मार्गाचा दर्जा दिला.