वर्धा : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. दरम्यान, 31 जुलैनंतर अता 10 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा भाजपमध्ये मेगाभरती होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरच बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये मेगाभरती नाही तर लिमिटेड भरती सुरू असल्याचे म्हटले आहे. भाजपची सध्या राज्यभरात महाजनादेश यात्रा सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर वर्ध्यात मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या भरतीवर वक्तव्य केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मेगाभरती, ईव्हीएम आणि इतर मुद्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी ही मेगाभरती नाही तर लिमिटेड भरती आहे आम्ही भरती बंद केली नाही. तसेच विदर्भातील काही लोक येण्यास तयार असतील आणि पक्षाच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवतील अशा लोकांना पक्षाचे दरवाजे नेहमीच उघडे असतील असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केली.