पीडीपी नेत्या मेहबुबांकडून निषेध
श्रीनगर- केंद्र सरकारने केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या शंभर अतिरीक्त कंपन्या काश्मीरात तैनात केल्या आहेत.तथापी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की जम्मू काश्मीरची समस्या ही राजकीय समस्या आहे. ती लष्करी बळाच्या आधारे सोडवता येणार नाही. केंद्र सरकारने आपल्या एकूणच काश्मीर धोरणाचा फेरविचार केला पाहिजे असे त्या म्हणाल्या.
जम्मू काश्मीरात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दोन दिवसांचा दौरा केला होता. ते दिल्लीत परत आल्यानंतर लगेच तेथे हे दहा हजार जादा जवान तिकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापी या कृत्याद्वारे राज्यातील जनतेला भयभीत करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची टीकाहीं सरकारवर केली जात आहे. तथापी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती सुरळीत ठेवण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.