सविंदणे – कवठे येमाई (ता. शिरूर) येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत गेल्या आठ दिवसांपासून मलठण येथे बीएसएनएलची इंटरनेट केबल तुटल्यामुळे बॅंकेची सेवा बंद आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
आठ दिवसांपासून नागरिकांना पैसे काढणे, आरटीजीएस करणे शक्य झाले नाही. बॅंकेमध्ये सविंदणे, कवठे येमाई, मुंजाळवाडी येथील ग्राहकांची संख्या जादा असून नागरिकांची मोठी गर्दी बॅंकेमध्ये असते. परंतु इंटरनेट केबल तुटल्यामुळे आठ दिवसांपासून बॅंकेतील व्यवहार ठप्प झाले आहेत.
बीएसएनएल अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दुरुस्तीचे काम लवकर होऊ शकले नाही. त्यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. येत्या दोन दिवसांत इंटरनेट सेवा सुरळीत न झाल्यास बीएसएनएल ऑफिसला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा कवठे येमाई येथील माजी सरपंच दीपक रत्नपारखी यांनी दिला आहे.
आठ दिवसांपासून इंटरनेट बंद असल्यामुळे ग्राहकांना बॅंकेमधून पैसे काढता आले नाहीत. त्यामुळे नागरिक संतापले आहेत.
– संदीप पडवळ, मंडल कृषी अधिकारी