आळंदीत महावितरणचा कारभार
आळंदी – येथील प्रभाग क्रमांक तीनमध्ये विद्युत तारा लोंबकळत आहे. या तारा जमिनीपासून केवळ आठ फुटांवर असल्याने यामुळे अपघाताचा धोका वाढला असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. तरी या तारा भूमिगत कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, याबाबत येथील नगरसेवकांनी याबाबत वेळोवेळी तक्रार केली आहे, तरीही महावितरण काही कार्यवाही करीत नसेल सामन्य नागरिकांच्या तक्रारींची दखलही घेत नसेल, अशी संतप्त प्रतिक्रिया नगरसेवक तथा यात्रा समिती सभापती सागर बोरुंदिया सागर बोरुंदिया यांनी दिली.
सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत. त्यातच एखादी वाऱ्याची झुळक आली तर तारांचे घर्षण होते व ढिणग्या खाली पडतात त्यातच रस्त्याच्या कडेला पिकअपसारखी चारचाकी वाहने उभी केलेली असतात.
त्याठिकाणी तारा भूमिगत करा
प्रभाग क्रमांक तीन बरोबरच इंद्रायणी नगर परिसरात देखील खुल्या विद्युत वाहक तारांची हीच अवस्था आहे, तरी आळंदीत ज्या-ज्या ठिकाणी अशा विद्युत वाहक तारा आहेत त्या भूमिगत करण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक नगरसेवक सागर बोरुंदिया यांनी नागरिकांच्या वतीने केली आहे.