नवी दिल्ली – प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशाच्या ग्रामीण भागात येत्या दोन वर्षात 1 कोटी 95 लाख घरे बांधण्याचे उद्दीष्ट सरकारने या अर्थसंकल्पात ठेवले आहे.या प्रत्येक घरात एलपीजी गॅस व वीज कनेक्शन दिले जाणार आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तिसऱ्या टप्प्यात देशात 1 लाख 25 हजार किमी लांबीचे रस्ते दुरूस्त केले जाणार आहे.
त्यासाठी 80 हजार 250 कोटी रूपये इतका खर्च येणार आहे. त्या म्हणाल्या देशात रस्ते बांधणीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आला असून देशातल्या 97 टक्के वस्त्यांना पक्के रस्ते आत्तापर्यंत पुरवण्यात आले आहेत.