केरळ – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या तीन दिवसाच्या केरळ दौऱ्यावर आहेत. वायनाडमधून विजयी झाल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच दौऱ्यावर आहेत. दरम्यान सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या राहुल गांधी यांनी वायनाड येथे सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. ”नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी खोटेपणाचा वापर केला. मोदी हे देशातील जनतेमध्ये फूट पाडण्यासाठी द्वेषाच्या विषाचा वापर करत आहेत,” असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
Rahul Gandhi in Wayanad: At the national level we’re fighting poison. Mr Narendra Modi uses poison, I’m using a strong word but Mr Narendra Modi uses poison of hatred to divide this country. He uses anger & hatred to divide the people of this country. He uses lies to win election pic.twitter.com/I7R1qrblJl
— ANI (@ANI) June 8, 2019
वायनाड येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी आक्रमक भाषेत नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. आज राष्ट्रीय पातळीवर आम्ही विषाशी लढा देत आहोत. मी कठोर शब्द वापरतोय, असे तुम्हाला वाटत असेल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील जनतेमध्ये फूट पाडण्यासाठी द्वेषाच्या विषाचा वापर करत आहेत. राग आणि द्वेषाचा वापर करून ते देशातील जनतेमध्ये फूट पाडत आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी खोटेपणाचा आधार घेत आहेत.” असा आरोप राहुल गांधी यांनी केला. शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे तीन दिवस राहुल गांधी केरळ मध्ये राहणार आहेत.