IND Vs ENG Test Seires : – भारताने इंग्लंडला दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभूत करत पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. आता येत्या १५ तारखेपासून तिसरा कसोटी सामना सुरु होत आहे. दुसऱ्या सामन्यात भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारा गोलंदाज जसप्रीत बुमराह याला या सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते असे संकेत मिळत आहेत.
निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने बुमराहला राजकोट कसोटीत विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. शेवटच्या दोन कसोटीत त्याला खेळवण्याचा विचार सुरू आहे. असे झाले तर महंमद सिराज पुन्हा संघात परतेल. दुसऱ्या सामन्यात सिराज खेळला नव्हता. दुसऱ्या कसोटीत बुमराहने ९ गडी बाद केले होते. त्यालाच सामन्याचा मानकरी घोषित करण्यात आले होते.
दरम्यान,विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत बुमराने दोन डावांत मिळून नऊ गडी बाद केले. विशेषत: पहिल्या डावात त्याने उत्कृष्ट गोलंदाजी करताना ४५ धावांत इंग्लंडच्या सहा फलंदाजांना माघारी धाडले. त्याने यॉर्करचा सुरेख वापर केला. त्याच्या कामगिरीमुळे भारताने दुसरा सामना जिंकत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. त्याने दुसऱ्या डावात तीन बळी मिळवले. मात्र, पहिल्या डावात सपाट खेळपट्टीवर त्याने केलेली गोलंदाजी फारच अप्रतिम होती. त्याने सहा बळी मिळवताना इंग्लंडला २५३ धावांत गुंडाळले आणि त्यानंतर इंग्लंडला पुनरागमन करणे शक्य झाले नाही.
तिसऱ्या कसोटीसाठी संभाव्य संघ – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, रजत पाटीदार किंवा विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, श्रीकर भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्सर पटेल, मुकेश कुमार, महंमद सिराज.