Bharat Nyay Yatra : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर काँग्रेस खासदार राहुल गांधी आणखी एक यात्रा काढणार आहेत. भारत जोडो यात्रेनंतर आता राहुल गांधी ‘भारत न्याय यात्रा’ काढणार आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर ते या वर्षी १४ जानेवारीपर्यंत भारत जोडो यात्रेचा दौरा केल्यानंतर आता राहुल ही नवीनयात्रा काढणार आहेत. येत्या १४ जानेवारीला मणिपूरपासून यात्रा सुरु होणार आहे.तर याचा शेवट २० मार्चला मुंबईत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल आणि याजरं रमेश यानू पक्षाच्या मुख्यालयात माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधींच्या यात्रेविषयी माहिती दिली. लोकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी ‘भारत न्याय यात्रा’ काढण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. कन्याकुमारी येथून सुरू झालेली भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये संपली. या प्रवासात राहुलने दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवास केला होता. तर ‘भारत न्याय यात्रा’ ईशान्येकडील राज्य मणिपूर येथून सुरू होणार असून, ती पश्चिमेकडील महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे संपणार आहे. अशा प्रकारे राहुल भारत न्याय यात्रेत पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करणार आहेत.
प्रवासात काय खास असणार आहे?
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे 14 जानेवारी रोजी मणिपूरमध्ये भारत न्याय यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. अशा प्रकारे हा प्रवास अधिकृतपणे सुरू होईल. ही यात्रा २० मार्चला मुंबईत संपणार आहे. भारत न्याय यात्रा 14 राज्यांतील 85 जिल्ह्यांतून जाणार आहे. भारत न्याय यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातून जाणार आहे. संपूर्ण प्रवासात 6200 किमी अंतर राहुल गांधी बस आणि पायी प्रवास करणार आहेत. 14 जानेवारीपासून सुरू होणार्या भारत जोडो यात्रेची दुसरी आवृत्ती म्हणून भारत न्याय यात्रेचे वर्णन करण्यात आले आहे.
यापूर्वी राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर २०२२ ते ३० जानेवारी २०२३ या काळात भारत जोडो यात्रा काढली होती. तामिळनाडूतील कन्याकुमारी पासून सुरु झालेला १४५ दिवसांचा प्रवास जम्मू काश्मीरमध्ये संपला. राहुल यांनी या ३५७० किलोमीटरच्या प्रवासात १२ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेश कव्हर केले होते.