मुंबई – चार वेळा उत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते नितीन चंद्रकांत देसाई यांचे अकाली निधन हे हिंदी चित्रपटसृष्टीची अवस्था आणि दुर्दशा या दोन्हींचे अत्यंत दु:खद संकेत आहे. शो ऑफच्या जीवनात मग्न असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील तमाम चित्रपट निर्माते आणि त्यांच्या कंपन्यांचे हे कटू सत्य आहे आणि हेही खरे आहे की, नितीन देसाई हे अनेक आठवडे कर्जबाजारी झाल्यामुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते. त्यांचा स्वत:चा जीव घेण्याचा निर्णयही याचाच परिणाम असल्याचे मानले जात आहे.
मात्र, नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एडलवाईस कंपनीच्या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी याबाबत रायगडच्या खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर भांदवी कलम 306 अंतर्गत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. आणि त्या अंतर्गत 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन देसाई यांच्या कंपनी एनडी आर्ट वर्ल्ड लिमिटेडने 2016 आणि 2018 मध्ये ईसीएल फायनान्सकडून एकूण 185 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. कोरोना कालावधीपूर्वीच त्याच्या पेमेंटमध्ये अडचणी येऊ लागल्या होत्या. जानेवारी 2020 मध्ये सुरू झालेल्या या समस्यांबद्दल नितीन चंद्रकात देसाई यांच्या काही जवळच्या मित्रांनाच माहिती होती.
Maharashtra | In art director Nitin Chandrakant Desai’s suicide case, Raigad Police registered Abetment to suicide case in Khalapur Police station against Edelweiss company (ECL) officers and others – a total of five people – following the complaint of Neha Nitin Desai, wife Of…
— ANI (@ANI) August 4, 2023
गेल्या महिन्याच्या 25 तारखेला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या मुंबई शाखेने एडलवाईस अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीची याचिका सुनावणीसाठी स्वीकारली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर, एनसीएलटीने अंतरिम व्यवस्थेसाठी नियुक्ती देखील केली होती. या आदेशात 30 मार्च 2021 पर्यंत नितीन देसाई यांना दिलेले कर्ज एनपीएच्या श्रेणीत आले होते, असे म्हटले होते.
आणि तेव्हापासून हे प्रकरण इतके टोकाला गेले होते की, नितीन यांना कर्ज देणाऱ्यांनी त्यांचा स्टुडिओ ताब्यात घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाची मदत घेत कारवाई सुरू केली होती. एक दिवस आपल्याला या स्टुडिओतून बेदखल व्हावे लागेल, अशी भीती नितीन यांना वाटत होती आणि याच तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.