नवी दिल्ली – मध्य प्रदेशातील आदिवासीबहुल शहडोलमधून माणुसकीला काळिमा फासणारी बातमी समोर आली आहे. रुग्णालयाने रुग्णवाहिका देण्यास नकार दिल्याने एका वडिलां आपल्या मुलीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन जाव लागला. या घटनेशी संबंधित काहीफोटोही समोर आले आहेत.
या प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी वंदना वैद्य यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची संवाद करून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. कोटा गावात 13 वर्षीय माधुरी गोंड सिकलसेल अॅनिमियाने ग्रस्त असून, तिचा या आजारामुळे मृत्यू झाला.
माधुरीच्या आई-वडिलांनी आपल्या मुलीचा मृतदेह त्यांच्या गावी नेण्यासाठी ऍम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांना सांगण्यात आले की नियमानुसार 15 किमी अंतरावर वाहन मिळू शकते, तर त्यांचे गाव रुग्णालयापासून 70 किमी अंतरावर आहे.
गरीब नातेवाईकांना खाजगी अम्बुलंसचा खर्च परवडत नव्हता. त्यामुळे मृतदेह मोटारसायकलवर शव घेऊन ते निघून गेले. मात्र मोटारसायकल शहराबाहेर येताच रात्रीच कोणीतरी जिल्हाधिकारी वंदना वैद्य यांना फोन करून माहिती दिली. स्वत: जिल्हाधिकारी वंदना वैद्य यांनी मध्यरात्री मृतदेह घेऊन जाणाऱ्या कुटुंबीयांना थांबवून सिव्हिल सर्जनला खडसावले व मृतदेह तातडीने पाठविण्याच्या सूचना दिल्या. सिव्हिल सर्जन डॉ.जी.एस.परिहार हे स्वतःही तेथे पोहोचले. जिल्हाधिकाऱ्यांनी पीडितेच्या कुटुंबाला काही आर्थिक मदतही केली.
पीडितेच्या पालकांना मृतदेह उपलब्ध करून त्यांच्या गावी पाठवण्यात आला. आदिवासीबहुल शहडोलमधून कधी खाटांवर, कधी लाकडी फळ्यावर, कधी सायकलवर, कधी बाईकवरून मृतदेह नेत असल्याचे वेदनादायक आणि दुःखद चित्रे समोर येत राहतात.