मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर काल आला. प्रतोत भरत गोगावले यांनी निवड चुकीची असल्याचे न्यायालयाने सांगितले तसेच राज्यपालांच्या कामावर देखील न्यायालयाने ताशेरे ओढले. यासोबतच आमदारांच्या अपात्रतेची निर्णय सध्याच्या अध्यक्षांवर सोपवण्यात आला आहे. अशात उद्धव ठाकरेंनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर भाष्य केले आहे.
आज माध्यमांशी संवाद साधत उद्धव ठाकरेंनी विविध गोष्टींवर भाष्य केले. आता आमदारांच्या अपात्रतेची निर्णय राहुल नार्वेकर घेणार आहेत. त्यांना उद्देशून ठाकरे म्हणाले,आज तर विधानसभा अध्यक्ष परदेशात आहेत. त्यांनी लवकरात लवकर यावं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे निर्णय घ्यावा.”
“अध्यक्ष त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतीलच पण त्यांनी उलट-सुलट काही केलं तर ज्याप्रमाणे आम्ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत, त्याचप्रमाणे जर इथे काही वेडंवाकडं झालं तर पुन्हा आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत. त्यानंतर त्यांची जी काही बदनामी होईल, तेव्हा मात्र यांना जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाहीत” असा इशा देखील यावेळी ठाकरेंनी दिला.
राजीनाम्यावर देखील केलं भाष्य
,”ज्या लोकांना माझ्या वडिलांपासून अगदी मी सुद्धा माझ्या पक्षप्रमुख काळामध्ये सर्वकाही भरभरून दिल, आपलं मानलं, विश्वास दिला.त्या विश्वास घातक्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवावा हे मला चालल नसत आणि अशा विश्वास घातक्यांचं सर्टिफिकेट घेऊन मला मुख्यमंत्री राहण्यामध्ये रस नव्हता म्हणूनच मी राजीनामा दिला” असं देखील ठाकरे यावेळी म्हणाले.