नवी दिल्ली : राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी गमवावी लागल्यामुळे काँग्रेस पक्षाकडून केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने निशाणा साधण्यात येत आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यानंतर आता काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी हल्लाबोल केला आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखात सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जबरदस्तीने मौन बाळगून देशाचे प्रश्न सुटणार नाहीत, असे म्हटले आहे. ‘जबरदस्तीचे मौन भारताच्या समस्या सोडवू शकत नाहीत’ या लेखात सोनियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विधानं आजच्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडं दुर्लक्ष करतात किंवा या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करतात. आता याकडं वारंवार दुर्लक्ष होऊ लागलंय. केंद्रातील मोदी सरकार भारताच्या लोकशाहीचे तीनही स्तंभ पद्धतशीरपणे मोडीत काढत असल्याचा आरोपही सोनिया गांधी यांनी केला आहे.
पुढे सोनिया गांधी यांनी आपल्या लेखात संसदेतील घटनांबद्दल, गेल्या अधिवेशनात आम्ही सरकारची रणनीती पाहिली, ज्या अंतर्गत विरोधकांना बेरोजगारी, महागाई, सामाजिक विभाजन, अर्थसंकल्प आणि अदानी यासारखे मुद्दे उपस्थित करण्यापासून रोखण्यात आलं.
सोनिया गांधींनी लेखात,’केंद्र सरकारनं विरोधाला तोंड देण्यासाठी अनेक उपायांचा अवलंब केलाय. यामध्ये भाषण बंद पाडणं, चर्चा थांबवणं, संसदेच्या मुद्द्यांवर हल्ला करणं आणि शेवटी काँग्रेस खासदाराला तडकाफडकी अपात्र ठरवणं यांचा समावेश आहे.’ सोनिया गांधींनी एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या संपादकीय लेखात,’लोकांच्या पैशांचा 45 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प कोणत्याही वादविवादाशिवाय मंजूर झाला, असाही आरोपही त्यांनी केंद्रावर केला आहे.