‘जर आम्हाला 400 जागा मिळाल्या तर PoK हा भारताचा भाग असेल’; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे विधान चर्चेत

Lok Sabha Election 2024 । आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार हर्ष मल्होत्रा यांच्या समर्थनार्थ निवडणूक रॅलीला संबोधित करताना सांगितल आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्यास मथुरेत भव्य मंदिर बांधले जाईल.
काशीमध्ये ज्ञानवापीच्या जागी भव्य मंदिर उभारले जाईल, असेही ते म्हणाले. निवडणूक सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, मुघलांनी देशात अनेक कारनामे केले आहेत. त्यापैकी अनेकांचा शोध घेणे बाकी आहे.
Lok Sabha Election 2024 । पीओके भारताचा भाग असेल
हिमंता म्हणाले की, काँग्रेस सत्तेत असताना काश्मीर भारताबरोबरच पाकिस्तानातही आहे, असे सांगण्यात आले होते आणि पाकव्याप्त काश्मीरही भारताचे आहे यावर संसदेत चर्चा झाली नाही, मात्र गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्येही , लोक भारतीय ध्वज घेऊन जाताना दिसतात. ते म्हणाले की, ते ताब्यात घेतले आहे, पण प्रत्यक्षात ते आमचे आहे.
गेल्या 7 दिवसांपासून तिथून चित्रे येत आहेत, तिथे रोज निदर्शने होत आहेत आणि तिथले लोक भारताचा झेंडा घेऊन पाकिस्तानचा निषेध करत आहेत. हे पाहून मला वाटते की ही तर सुरुवात आहे. मोदींना 400 जागा मिळाल्या तर पीओकेही भारताचा होईल.
Lok Sabha Election 2024 । 400 पेक्षा जास्त जागांची गरज का आहे ते सांगितले
हिमंता म्हणाले की, काँग्रेस आम्हाला वारंवार 400 पेक्षा जास्त जागांची गरज का विचारते. मी म्हणालो की आमच्याकडे 300 जागा असताना आम्ही भव्य राम मंदिर बांधले. आता आपल्याकडे 400 जागा असतील, मथुरेत कृष्णजन्मभूमीही बांधली जाईल आणि ज्ञानवापी मशिदीच्या जागी बाबा विश्वनाथांचे भव्य मंदिर बांधले जाईल. आम्हाला जागा देत राहा आणि आम्ही मुघलांनी केलेली कृत्ये साफ करत राहू.
हे वाचाल का ? महायुतीत जाणार का? आदित्य ठाकरे म्हणाले,’तोपर्यंत भाजपाबरोबर जाणार …’





