मुंबई -काल रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) दोन गटात वाद झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी वाहनांची जाळपोळ झाल्याचे देखील समोर आले. या राड्यानंतर पालकमंत्री संदिपान भुमरे यांची प्रतिक्रिया समोर आले आहे. तसेच भुमरे याबाबतची सर्व माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे.
यांनतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सावनी शांतता राखावी असे आवाहन करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले,’संभाजीनगरमधील तणाव आता निवळला आहे. आम्ही त्याकडे लक्ष ठेऊन आहोत. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही संभाजीनगरमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.’ अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
दरम्यान,किऱ्हाडपुरा येथील राममंदिराबाहेर रात्री बारा नंतर किरकोळ कारणावरून राडा झाला. यावेळी अनेकजण गोळा झाले होते. हल्लेखोरांनी अनेक वाहनांना आग लावली. यामध्ये पोलिसांची वाहने देखील जाळली. राड्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात चोख बंदोबस्त ठेवल्याचे समजते. तसेच कोणत्याही मंदिराचे नुकसान झालेलं नसून फिरवोर्ड मेसेज आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Maharashtra | A clash broke out between two groups in Chhatrapati Sambhajinagar’s Kiradpura area
Stones were pelted, some private & police vehicles were set on fire. Police used force to disperse the people and now the situation is peaceful. Police will take strict action… pic.twitter.com/u9qa5XYyPk
— ANI (@ANI) March 30, 2023