मुंबई – काल रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) दोन गटात वाद झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी वाहनांची जाळपोळ झाल्याचे देखील समोर आले. आता या राड्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी शिंदे गटासह भाजपवर निशाणा साधला आहे. सध्याच्या परिस्थितीवरून गृहमंत्रालय अस्तित्वात आहे कि नाही असा प्रश्न पडत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.
येत्या २ एप्रिलला महाविकास आघाडीची संभाजीनगरमध्ये सभा पार पडणार आहे. त्याआधी हा राडा झाला माध्यमांनी याबाबत संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले,”मी वारंवार सांगतोय या सरकराचा एकमेव हेतू आहे राज्यात अशांतता निर्माण व्हावी,दंगली घडाव्यात मुळात गृहमंत्री किंवा गृहमंत्रालय अस्तित्वात आहे कि नाही ? हाच प्रश्न आहे.”
संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यावरून संजय राऊत यांनी सरकारला धारेवर ठरले. मी वारंवार सांगतोय ते फडणवीस दिसत नाहीयेत. सध्याचे फडणवीस निराश आणि वैफल्यग्रस्त काम करताना दिसत आहेत.त्याची कारणे शोधावी लागतील असं स्पष्ट मत राऊत यांनी व्यक्त केलं. काल संभाजीनगरला जी परिस्थिती निर्माण झाली हे सरकारच अपयश आहे. महाराष्ट्रात असे वातावरण निर्माण व्हावं ही सरकारची इच्छा आहे आणि त्यासाठी मिंधे गटातील टोळ्या काम करत आहेत असा आरोप यावेळी संजय राऊत यांनी केला.
काय घडलं संभाजीनगरला नेमकं
किऱ्हाडपुरा येथील राममंदिराबाहेर रात्री बारा नंतर किरकोळ कारणावरून राडा झाला. यावेळी अनेकजण गोळा झाले होते. हल्लेखोरांनी अनेक वाहनांना आग लावली. यामध्ये पोलिसांची वाहने देखील जाळली.
राड्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात चोख बंदोबस्त ठेवल्याचे समजते. तसेच कोणत्याही मंदिराचे नुकसान झालेलं नसून फॉरवर्ड मेसेज आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.