पुणे – भाजप नेते खासदार गिरीष बापट यांचे आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळातून त्यांच्या जाण्याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. आजराला देखील न घाबरता एका योध्याप्रमाणे त्यांनी आजाराशी संघर्ष केला असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरीश बापट यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,”आरएसएसपासून त्यांची सुरुवात झाली नागसेवक, मंत्री, आमदार, खासदार असा प्रवास करत त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं”. शिंदे पुढे म्हणाले,सर्व समाजाशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांनी नेहमीच माणसं जोडली तसेच आजरी असताना देखील त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिल असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी कसबा निवडणुकीची आठवण करून दिली.
“सर्वांना हवा हवासा वाटणारा असा नेता आम्ही गमावला. प्रथम राष्ट्र.. संघटन.. नंतर व्यक्ती हे ध्येय त्यांनी पाळलं. आमचे त्यांचे स्नेहाचे संबंध होते एक दिलदार माणूस अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांना ईश्वर हे दुःख पचवण्याची ताकद देवो” अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याची माहिती भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी माध्यमांना दिली.दरम्यान गिरीष बापट यांच्या पश्चात कुटुंबात एक मुलगा आणि पत्नी आहेत.