दिमापूर – ख्रिश्चन समुदायाने राष्ट्र उभारणीत मोठे योगदान दिले आहे, परंतु त्यांना योग्य तो सन्मान मिळत नाही. म्हणूनच आता ख्रिश्चन समाजातील लोकांना संघटित होऊन देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल बोलले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री जॉन बार्ला यांनी केले.
नागालॅंडच्या दिमापूरमध्ये नॅशनल ख्रिश्चन कौन्सिलने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बार्ला नोलत होते. बार्ला पुढे म्हणाले की, ख्रिश्चन समुदायाने उभारलेल्या संस्थांमध्ये शिक्षण घेतलेले लोक आयएएस अधिकारी, डॉक्टर, अभियंते आणि अगदी राजकारणी बनले आहेत. आजवरच्या सरकारांनी विशिष्ट धर्मियांचेच लांगुलचालन केल्याने ख्रिश्चन धर्म मागे पडला आहे.
Jharkhand : कॉंग्रेसच्या चार नेत्यांचे ‘या’ कारणामुळे पक्षातून निलंबन
जाती-धर्मावरुन राजकारण करत असलेल्यांना सांगायला हवे की, आम्ही देशाला काय दिले? आम्ही आमचा बिगुल वाजवत नाही, म्हणूनच आम्हाला मान मिळत नाही. राष्ट्र उभारणीत ज्यांनी मोठे योगदान दिले त्यांची चर्चेस आज नष्ट होत आहेत. याविषयी सर्व समाजबांधवांनी एकत्र येत चळवळ उभी करायला हवी, असे बार्ला शेवटी म्हणाले.