वडूज – खटाव-माण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसाठी भाजप सातारा जिल्हाध्यक्ष व खटाव-माणचे आ. जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे मतदार संघात 42 कोटी 71 लाख 68 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे मागासवर्गीय वस्तीला जोडणाऱ्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेला गती येणार असून वडूज, (ता. खटाव) येथे झालेल्या रिपाइं (आठवले गट) बैठकीत आ. गोरे यांच्या कार्यपद्धतीबद्दल त्यांचा अभिनंदन ठराव केल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते व बैठकीची अध्यक्ष मयुर बनसोडे यांनी दिली.
याबाबत त्यांनी सांगितले की, सर्वसामान्य कार्यकर्त्याला केंद्रबिंदू मानून व ज्या मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता भाजपला मतदान केले. हे मतदान करताना मित्रपक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाने खूप मोठे योगदान दिलेले आहे. भगवान बुद्ध, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सन्मान राखून आ. गोरे हे वाटचाल करीत आहेत. आ. जयकुमार गोरे यांनी खटाव व माण तालुक्यातील अनेक गावांमध्ये विकास कामे करून राजकीय विरोधकांना चितपट केले आहे.
मतदारसंघात प्रत्येक खेड्यापाड्यांमध्ये विशेषता दहिवडी, वारुगड, गोंदवले, निमसोड, तुपेवाडी, शिंदे बुद्रुक, मायणी, गोरेगाव वांगी, सोकासन, मोही, खडकी, वावरहिरे, डंगिरेवाडी, मार्डी, गोंदवले, राणंद, कातर खटाव, एनकुळ, खटाव, गाडगे वस्ती, निमसोड, कदम वस्ती, म्हसवड, वाकेश्वर, गुरसाळे, शिरसवडी, अंबवडे, गोपूज, किरोली-सिद्धेश्वर, कुमठे, कानकात्रे, यलमरवाडी, पडळ, मरडवाक, कलेढोण, वरुड, भुरकवडी, नांदोशी, भोसरे, लोणी,बिदाल, जायगाव, कोकराळे, त्रिमली, औंध, नढवळ, पेडगाव, अशा विविध गावांमध्ये आमदार विकास निधी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून हा निधी मंजूर केलेला आहे. 14 वर्षांमध्ये दलित मागासवर्गीय मतदारांसाठी 140 कोटी रुपयाचा निधी मतदार संघात आणण्याचा प्रयत्न आ.जयकुमार गोरे यांनी केलेले आहे.
एकेकाळी खटाव-माण मतदारसंघात दुष्काळी भाग म्हणून हिणवला जात होता. आज सर्व गावे टॅंकरमुक्त झालेली आहेत. मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक व सर्व जाती-धर्मांना न्याय देणारे नेतृत्व जयकुमार गोरे यांच्या रुपाने लाभले असल्याचे मान्यवरांनी बैठकीत सांगितले. यावेळी सिद्धेश्वर कुरोलीचे माजी सरपंच संतोष भंडारे, रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल गडांकुश, अजित कंठे, अजिंक्य वाघमारे, दाऊद सय्यद, हरिदास बनसोडे, दीपक काळोखे, अभिजित साठे, विठ्ठल नलावडे, भिकाजी शिंदे, सत्यपाल डावरे, नितीन जगताप, अमोल झोडगे, सौ मंगला रणपिसे, सौ.वंदना जगताप, ललिता कीर्तिकर उपस्थित होते. दरम्यान, लवकरच आ. गोरे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार असल्याचे रिपाइंचे बाळासाहेब गायकवाड यांनी यावेळी सांगितले.