बेळगाव :- कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमावादवर केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा विषय पुन्हा चिघळला आहे. यावर काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
संजय राऊत यांना प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव न्यायालयाने समन्स बजावले आहे. तसेच त्यांना 1 डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. बेळगावात 30 मार्च 2018 रोजी केलेल्या भाषण प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. ते न्यायालयात हजर न झाल्यास त्यांच्या अटकेची शक्यता आहे.
बेळगाव न्यायालयाने पाठवलेल्या समन्सवर संजय राऊत म्हणाले, सीमा भागातील बांधवांवर कर्नाटक सरकारने हल्ले केले किंवा कायद्याचा बडगा दाखवून त्यांना तुरुंगात टाकले, तर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटतील. यामध्ये प्रक्षोभक काय आहे? हे मला कळलं नाही, असं ते म्हणाले आहेत.
Gujarat Election 2022 : दहशतवादाच्या विरोधातील लढाईत आम्ही दोन पंतप्रधान गमावले – मल्लिकार्जून खर्गे
ते म्हणाले, 2018 मध्ये केलेल्या भाषणाची दखल घेऊन मला त्यांनी आता कोर्टात हजर राहण्यास सांगितलं आहे. याचा अर्थ मी तिथे कोर्टात जावं आणि कोर्टात गेल्यावर माझ्यावर हल्ला व्हावा, अशी माझ्याकडे माहिती असल्याचं ते म्हणाले आहेत.