IND vs SA – टी-२० विश्वचषकातील सलग दोन विजयांनंतर भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. रविवारी पर्थ येथील क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकाने भारताचा ५ गडी राखून पराभव केला आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ९ गडी गमावून १३३ धाव केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाने ५ गडी आणि २ चेंडू शिल्लक असतानाच सामना खिशात घातला.
IND vs SA | सामन्यातील ‘या’ चुकांमुळे टीम इंडिया पराभव, रोहितही जबाबदार!
या सामन्यात भारतीय संघाला आफ्रिकेवर वर्चस्व मिळवण्याच्या अनेक संधी आल्या. मात्र संघाला त्याचा फायदा घेता आला नाही. आफ्रिकेला ६० चेंडूंत ९४ धावा विजयासाठी करायच्या होत्या. आर अश्विनच्या चेंडूवर मार्कराने मारलेला फटका विराटला सहज टिपता आला असता, पण त्याच्याकडून झेल सुटला. यानंतर एडन मार्कराम व डेव्हिड मिलर ही जोडी मैदानावर खेळत असताना मार्करामला धावबाद करण्याची चांगली संधी होती मात्र, रोहितला त्याला धावबाद करता आले नाही. मार्कराम बराच लांब होता आणि रोहितच्या डायरेक्ट हिटने आफ्रिकेला अडचणीत आणले असते. मात्र खराब क्षेत्ररक्षणामुळे भारताला पराभव स्वीकारावा लागला. त्या दोन्ही चुका खेळाडूंनी केल्या नसत्या तर सामान्याचा निकाल कदाचित वेगळा पाहायला मिळाला असता.
भारताकडून फलंदाजीत सूर्यकुमार यादवने दमदार कामगिरी केली. भारताचा संघ पहिल्यांदा फलंदाजी करत असताना एक वेळी संघाची धावसंख्या ४९ धावांवर ५ गडी बाद अशी होती. तेथून पुढे सूर्यकुमारने संघाच्या डावाला सावरले आणि १३३ धावांपर्यंत पोहोचवले. त्याने ४० चेंडूत ६८ धावांची खेळी खेळली. विशेष म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त भारताच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आलेली नाही. मागील दोन सामन्यात चमकदार कामगिरी करणारा विराट कोहलीही फक्त १२ धावा करून बाद झाला.
भारताच्या गोलंदाजीच्या वेळी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र महत्वाच्या वेळी गोलंदाजांना क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही. एकदा विराट कोहली तर दुसऱ्यांदा कर्णधार रोहित शर्माने चुका केल्या आणि त्याचा तोटा भारतीय संघाला पराभवाच्या रूपाने मिळाला. कारण विराटकडून सुटलेला झेल अत्यंत सोपा होता. कोणालाही वाटले नसेल की, हा झेल सुटेल. त्यानंतर रोहितच्या हातून एडन मार्कराम हा धावबाद व्हायला हवा होता, परंतु तेथेही रोहित चुकला आणि मार्करामला जीवदान मिळाले.
A thrilling win for South Africa and it takes them to the top of the table in Group 2 💪#INDvSA | #T20WorldCup | 📝: https://t.co/uficuiMq0H pic.twitter.com/0TLFpUmAd7
— ICC (@ICC) October 30, 2022
सुपर-१२ मधील गट-२ च्या गुणतालिकेत घसरण झाली असून भारत आता दुसऱ्या स्थानी आला आहे. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह गुणतालिकेतील अव्वल स्थानावर ताबा मिळवला आहे. सध्या गुणतालिकेत आफ्रिकन संघ ५ अंकांसह भारतापेक्षा मजबूत स्थितीत आहे. यानंतर आता भारताचा सुपर-१२ मधील चौथा सामना बांगलादेश विरुद्ध २ नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. तर शेवटच्या आणि पाचव्या सामन्यात भारताला झिम्बाब्वेचा सामना करायचा आहे. त्याचबरोबर या सामन्यांमध्ये जर पावसाने अडथळा निर्माण केला तर भारताचे सेमीफायनलमध्ये जाण्याचे समीकरण बिघडू शकते.
Undefeated South Africa go on top of the Group 2 table 🌟#T20WorldCup Standings 👉 https://t.co/cjmWWRz68E pic.twitter.com/A4cpQMRgnP
— ICC (@ICC) October 30, 2022