जालना : जालना जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. अशी ग्वाही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. जालना रेल्वे स्थानकावर कोच देखभाल सुविधांचा विकास (पीटलाईन) च्या कामाचे भूमीपूजन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे उपस्थित होते.
Laid the foundation stone of pit line & coach maintenance facility in Jalna. pic.twitter.com/81JOt30Yjd
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) October 3, 2022
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार केंद्रीय रल्वे मंत्री वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली पुढील 25 वर्षांचे व्हिजन डोळयासमोर ठेवत राज्यात रेल्वेच्या सुविधा वाढविण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये रेल्वे विकासासाठी 11 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन या निधीतून विविध कामांचे नियोजन करण्यात येत आहे. जालना जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी विविध प्रकल्प जिल्ह्यात आणण्यात येत आहेत. उद्योजकांचा माल कमी वेळेत व कमी खर्चात पोहोचविण्यासाठी ड्रायपोर्ट प्रकल्प साकारण्यात येत आहे. मल्टी मॉडेल लॉजिस्टीक पार्कची घोषणाही नुकतीची करण्यात आली असुन यासाठी 450 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात रेल्वे पायाभूत सुविधांचे बळकटीकरण.
छत्रपती संभाजीनगर व जालना रेल्वे स्टेशन येथे कोच देखभाल सुविधेचा (पिटलाईन) विकास कार्यक्रमाचा पायाभरणी सोहळा आज केंद्रीय मंत्री श्री @AshwiniVaishnaw जी यांच्या हस्ते पार पडला.(1/8) pic.twitter.com/v6iChByyx0
— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) October 3, 2022
पुढे ते म्हणाले की, देशामध्ये केवळ तीन ठिकाणीच आयसीटी महाविद्यालय असून यामध्ये जालना जिल्ह्याचा समावेश आहे. या महाविद्यालयासाठी 66 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आज 100 कोटी रुपयांच्या पीटलाईनचे भूमीपूजनही करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाच्या बाजुने मुंबई ते नागपूरपर्यंत रेल्वे प्रकल्प करता येईल काय याबाबत पहाणी करण्यात येणार आहे. जालन्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने नुकतीच 45 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारमार्फत निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचेही राज्यमंत्री दानवे यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात दक्षिण रेल्वेचे महाप्रबंधक अरुणकुमार यांनी स्थानकावर कोच देखभाल सुविधांच्या विकास (पीटलाईन) बाबत सविस्तर अशी माहिती दिली. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, नागरिक, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.