लंडन – कर्णधार हरमनप्रीत कौरने केलेली शतकी खेळी व भारताच्या महिला संघाने उभारलेला त्रिशतकी धावांचा डोंगर यांच्या जोरावर यजमान इंग्लंड महिला संघावर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार विजय मिळवला. या विजयाच्या जोरावर भारताच्या महिला संघाने तब्बल 23 वर्षांनंतर इंग्लंडचा त्यांच्याच भूमीत पराभव करत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
टी-20 सामन्यांची मालिका गमावल्यावर भारतीय संघाने आपला खेळ उंचावताना एकदिवसीय मालिका तिसऱ्या व अखेरच्या सामन्यापूर्वीच जिंकली. पहिला सामना 7 गडी राखून जिंकला तर दुसरा सामना 88 धावांनी जिंकला. यापूर्वी भारताच्या महिला संघाने 1999 साली इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्याची कामगिरी केली होती. इंग्लंडमध्ये एकदिवसीय द्विपक्षीय मालिका सर्वात जास्तवेळा जिंकण्य बाबतीत भारतीय संघ न्यूझीलंडसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आला आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत इंग्लंडच्या भूमीवर दोनवेळा मालिका जिंकली आहे.
हरमनप्रीत कौरने 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 100 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने 143 धावांची नाबाद खेळी खेळली. भारताने शेवटच्या पाच षटकांत 80 धावा जोडल्या आणि 50 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 333 धावा केल्या.
Captain @ImHarmanpreet led from the front, hammering 143* & bagged the Player of the Match award as #TeamIndia beat England by 88 runs in the 2⃣nd ODI to take an unassailable lead in the series. 👏 👏 #ENGvIND
Scorecard ▶️ https://t.co/dmQVpiNH4h pic.twitter.com/lHrfOQDBX7
— BCCI Women (@BCCIWomen) September 21, 2022
या आव्हानासमोर इंग्लंडचा संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही व त्यांचा डाव 44.2 षटकांत 245 धावांत संपुष्टात झाला. डॅनियल वॅटने सर्वाधिक 65 धावा केल्या. रेणुका सिंगने 57 धावांत चार गडी बाद केले. आता या मालिकेतील तिसरा व अखेरचा एकदिवसीय सामना 24 सप्टेंबर रोजी लॉर्डसच्या मैदानावर खेळवला जाईल.