नवी दिल्ली – रशिया- युक्रेन युद्ध सुरू होण्याच्या अगोदर भारत युक्रेनकडून मोठ्या प्रमाणात सूर्यफूल तेलाची आयात करीत होता. मात्र आता रशिया व अर्जेंटिनाकडून सूर्यफूल तेलाची आयात वाढले आहे.
ऑगस्ट महिन्यात भारताची सूर्यफूल तेलाचे आयात 89 टक्क्यांनी वाढून 1.35 लाख टन इतकी झाली आहे. युद्ध सुरु होण्याअगोदर भारत आपल्या एकूण सूर्यफूल तेलाच्या गरजेच्या 70 टक्के तेल युक्रेनमधून खरेदी करत होता.
मात्र आता युक्रेनची जागा रशिया आणि अर्जेटिनाने घेतली आहे. युद्ध सुरु झाल्यानंतर जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्यामुळे चिंता निर्माण झाली होती.
मात्र जागतिक बाजारत खाद्यतेलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचबरोबर पुरवठा साखळीवरील परिणाम संपुष्टात आला आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून खाद्य तेलाच्या किमती जागतिक बाजारात कमी होत आहेत. त्यामुळे भारताला कमी प्रमाणात परकीय चलन वापरावे लागत आहे.