मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत सध्या ईडीच्या कस्टडीत आहेत. काल राऊत यांनी कस्टडीतुन सामनासाठी रोखठोख लिहीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर राऊतांच्या कस्टडीतुन लेख लिहिण्यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच टीका झाल्याचे पाहायला मिळले. राऊतांच्या या लेख लिहीण्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील त्यांना जोरदार टोला लगावला आहे.
अतुल भातखळकर यांनी एक ट्विट करत संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आगाऊपणामुळे पक्ष संपला, पण यांचा आगाऊपणा मात्र संपत नाही. ED च्या कोठडीतून रोखठोक लिहिलंय, भ्रष्टाचार कसा बुडाशी येतो, असा एखादा लेख लिहा म्हणावं”.
भातखळकर यांच्या आधी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील ट्विट करत संजय राऊत यांच्या लेख लिहिण्यावर काही सवाल उपस्थित केले होते. आज सामना मध्ये संजय राऊत यांच रोखठोक हे सदर आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र सेनानी नाहीत की त्यांना जेल मधून लेखनाची परवानगी मिळावी की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत? असा सवाल देशपांडेंनी उपस्थित केला होता.
आज सामना मध्ये संजय राऊत यांच रोखठोक हे सदर आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र सेनानी नाहीत की त्यांना जेल मधून लेखनाची परवानगी मिळावी की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 7, 2022