नवी दिल्ली – देशात साखरेचे उत्पन्न जास्त झाल्यामुळे साखर निर्यातीवरील काही निर्बंध केंद्र सरकारने आज शिथिल केले. अगोदर केंद्र सरकारने फक्त एक कोटी टन साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली होती. रशिया- युक्रेन युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे आगामी काळात भारतात साखरेचे दर वाढू नये नये यासाठी मे महिन्यामध्ये केंद्र सरकारने साखर निर्यातीला मर्यादा घातल्या होत्या.
मात्र आता जागतिक परिस्थिती सुधारत आहे. त्याचबरोबर देशामध्ये बरीच साखर पडून आहे. त्यासाठी आणखी साखर नियातीला परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात येत होती. गेल्या वर्षीय 70 लाख टन साखरेचे निर्यात करण्यात आले होती. यावर्षी देशामध्ये 355 लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. उसापासून साखरेबरोबरच इथेनॉल निर्माण करण्यासाठी सरकार प्राधान्य देत आहे.
त्यामुळे साखरेचे निर्यात करण्याऐवजी हे इथेनॉल इंधनामध्ये मिसळण्यास मदत होईल असे सरकारला वाटते. गेल्या पाच वर्षापासून साखर कारखान्यानी अपेक्षाप्रमाणे इथेनॉलचे उतपदन सुरू केले आहे. त्यामुळे भारताची कच्च्या तेलाची आयात कमी होण्यास मदत होणार आहे.