मुंबई – राज्यपालांच्या पत्रानंतर कॅबिनेट घ्यायची नसते असे संकेत आहेत. मात्र शेवटच्या क्षणी नामांतराचे निर्णय घेतले. ते आता पुन्हा घ्यावे लागणार आहेत. अशी माहिती भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केला त्यांनतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते.
यावेळी फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असतील, असे त्यांनी सांगितले. या सरकारच्या मंत्रिमंडळात फडणवीस नसतील अशीही घोषणा करण्यात आली आहे. आज संध्याकाळी साडे सात वाजता एकट्या एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केली आहे.
दरम्यान, कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती .