नवी दिल्ली – राजस्थानच्या उदयपूरमध्ये मंगळवारी संध्याकाळी एका शिंप्याची दोन तरुणांनी हत्या केली. कन्हैयालाल नावाच्या शिंपीची दोन तरुणांनी गळा चिरून हत्या केली. कन्हैया लाल त्याच्या दुकानात काम करत होता, त्याच दरम्यान दोन तरुण त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याला विचारले की तू झब्बा पायजमा शिवणार का? या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून त्यात कन्हैया लाल मारेकरी तरुणाची मापे घेताना दिसत आहे.
संबंधित दुकादाराची हत्या करतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका अन्य व्हिडिओत दोन व्यक्ती हत्येची कबुली देताना आणि हत्येसाठी वापरेले शस्त्र दाखवताना दिसत आहेत. एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार संबंधित दुकानदाराच्या 8 वर्षीय मुलाने नुपूर शर्मा यांच्या समर्थनाची एक पोस्ट टाकली होती. त्यानंतर दोन व्यक्तींनी त्याच्या वडिलांची अर्थात दुकानदार कन्हैया लाल यांची हत्या केली.
उदयपूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर तब्बल 7 तास गदारोळ झाला. नातेवाइकांनीही मृतदेह रस्त्यावर ठेवून प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली असून प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेण्यात आला. त्याचवेळी या घटनेची गंभीर दखल घेत गृह मंत्रालयाने एनआयएची टीम पाठवली आहे. दहशतवादी कटाचा पर्दाफाश करण्याच्या उद्देशाने एनआयए या घटनेची चौकशी करणार आहे.
दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, ही घटना घडली तेव्हा कन्हैया लालचे आणखी दोन कारागीर तिथे काम करत होते. त्याने सांगितले की, रियाझ आणि मोहम्मद घौस नावाचे दोन तरुण दुकानात आले आणि विचारले की तुम्ही झब्बा आणि पायजमा शिवता का? यानंतर कन्हैयालाल म्हणतो का शिवणार नाही. मग कन्हैयालालने त्यांची मापे घ्यायला सुरुवात केली. यावेळी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की त्याच्यावरही हल्ला करण्यात आला पण तो पळून जाण्यात यशस्वी झाला आणि कन्हैया लाल बाहेर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.
काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी या घटनेचा निषेध करत राजस्थान सरकारलाच सवाल केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना ट्विट करून विचारले आहे की,’“धमक्या मिळाल्यानंतरही कन्हैयाला सुरक्षा का पुरवण्यात आली नाही? मारेकऱ्यांबरोबरच पोलीस प्रशासनही तितकेच दोषी आहे. एसएसपी, डीआयजीवर अद्याप कारवाई का झाली नाही? राजस्थानमधील सरकारचा विश्वास पूर्णपणे संपला आहे का?’
काही दिवसांपूर्वी कन्हैयालालने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती, त्यामुळे तरुण संतापले होते आणि त्याने धमकीही दिली होती. कन्हैयालाललाही पोलिसांनी अटक केली होती, पण नंतर सोडून देण्यात आले. कन्हैया लालनेही पोलिसांकडे संरक्षणाचे आवाहन केले होते.