ठाणे – ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीणमधील एका गावात शनिवारी एका कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खाणीतून पाणी आणत असताना ही दुर्घटना घडली.
त्यात मीरा गायकवाड (55), अपेक्षा (30) आणि मयुरेश (15), मोक्ष (13) आणि नीलेश (15) अशी मृतांची नावे आहेत. खाणीतून पाणी काढत असताना यातील महिलेचा तोल गेला आणि ती पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी बाकीच्यांनीही प्रयत्न केले त्यातून त्यांचाही यात दुर्देवी मृत्यू ओढवला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे.
या घटनेचा अधिक तपशील अजून मिळालेला नाही. खाणीतून हे पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मरण पावलेले पाचही जण एकाच कुटुंबातील आहेत.