मुंबई – अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यासंदर्भातील विषयावरुन शिवसेना आणि भाजपा यांच्यात सध्या शाब्दिक चकमक होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राममंदिर आंदोलना मध्ये शिवसेनेचा एकही नेता किंवा शिवसैनिक त्या ठिकाणी नव्हता असे त्यांनी जाहीर सभेत म्हटले होते.
त्यांच्या या दाव्यावर आता शिवसेनेकडून सडेतोड उत्तर देण्यात येत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देतांना फडणवीसांवर खोचक टीका केली होती. जेव्हा ती घटना घडली त्या वेळी फडणवीसांचं वय काय? असेल कदाचित १३ वर्षे मग जर ते बाबरीच्या सहभागात असेल आणि आडवाणींनी बाबरी मशीद पाडायला नेल असल तर आडवाणींनी बालकाचे प्राण धोक्यात घातले म्हणून केस होईल.’असं म्हणत पाटील यांनी फडणवीसांवर घणाघात केला. त्यांच्या या टीकेवर आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी जयंत पाटलांना यांना ट्विट करत प्रतिउत्तर दिले आहे.
काय आहे चित्रा वाघ यांचे ट्विट
‘बाबरी मशीद पडली तेव्हा देवेंद्र फडणवीस फक्त १३ वर्षांचे,अडवाणींनी लहान मुलाचे प्राण धोक्यात घातले’ इति जंत पाटील. १९७० साली जन्मलेले देवेंद्रजी १९९२ साली १३ वर्षांचे होते हे जयंत पाटलांचे गणित बघून त्यांच्या गणिताच्या शिक्षकांना पश्चाताप होत असेल… हेची फळ काय मम तपाला।
‘बाबरी मशीद पडली तेव्हा देवेंद्र फडणवीस फक्त १३ वर्षांचे,अडवाणींनी लहान मुलाचे प्राण धोक्यात घातले’ इति जंत पाटील.
१९७० साली जन्मलेले देवेंद्रजी १९९२ साली १३ वर्षांचे होते हे जयंत पाटलांचे गणित बघून त्यांच्या गणिताच्या शिक्षकांना पश्चाताप होत असेल…
हेची फळ काय मम तपाला। pic.twitter.com/wc7cUw0hb9— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 3, 2022