पाचगणी – जागतिक पर्यटनस्थळ महाबळेश्वरमध्ये वाहतूक कोंडी हा नित्याचाच प्रश्न झाला आहे. शहरातील मुख्स बाजारपेठेत दुचाकी व चारचाकी यांना प्रवेश बंदी असताना देखील वाहतुकी कोंडी होत असल्याची तक्रार सातारा पोलिसांकडे येथील स्थानिकांकडून करण्यात आली होती.
या तक्रारीवर महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांनी पोलीस अमंलदाराच्या कमतरतेमुळे मुख्य चौकात वाहतूक कोंडी कोंडींचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याची माहिती तक्रार निवारणात दिली. तसेच या तक्रारीची दखल घेत मुख्य बाजार पेठेतुन दुचाकी व चारचाकी दंड आकारण्याचे कारवाई केली गेली, असे असले तरी पोलीस अमंलदाराच्या कमतरतेमुळे मुख्य बाजार पेठेत खासगी वाहनांची कोंडी होत आहे.
दरम्यान, वाहतूक कोंडीच्या या प्रश्नावर सातारा जिल्ह्याचे गृहराज्य मंत्री शंभुराजे देसाई महाबळेश्वरच्या वाहतुक कोडींचा दुर करणार का? असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जातो आहे. स्थानिकांकडून वाहतूक कोडींवर योग्य नियोजन करण्याची मागणी शंभुराजे देसाई यांना करण्यात येत आहे.त्यामुळे आता या तक्रारीची दखल गृहराज्यमंत्री घेणार का अशी विचारणा करण्यात येत आहे.