नवी दिल्ली : आज राज्यसभेतून 72 सदस्य निवृत्त झाले. या सदस्यांना आज राज्यसभेत निरोप देण्यात आला, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व सदस्यांना त्यांच्या भावी जीवनाविषयी शुभेच्छा दिल्या. तसेच ज्ञानापेक्षा अनुभवाची ताकद जास्त असते असे प्रतिपादन देखील यावेळी केले. निवृत्त होणाऱ्या सगळ्यांजवळ मोठा अनुभव, अनुभवाची ताकद मोठी असते. त्यामुळं समस्यांचे निराकरण होते असेही मोदी यावेळी म्हणाले.
72 सदस्य निवृत्त होताना सभागृहात उपराष्ट्रपती आणि सभापती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे खासदार आणि ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सदस्यांसाठी निरोपाची भाषणे केली. दरम्यान, आपल्या भाषणातून मोदींनी निरोप घेणाऱ्या सदस्यांना गुजराती पद्धतीने ‘आवजो’ म्हणताच सभागृहातील इतर सदस्यांनी त्याला दाद दिली. “गुजरातीमध्ये म्हणतात आवजो.. पुन्हा या. तसं तर बायबायच म्हणत असतात, पण बोलताना आवजो म्हणतात. आम्ही देखील या क्षणी हेच म्हणू की पुन्हा या”, असे मोदी निरोप घेणाऱ्या ७२ सदस्यांना उद्देशून म्हणाले.
Our RS Members have a lot of experience..sometimes experience has more power than academic knowledge.. We will say to the retiring members ‘come again’: Prime Minister Narendra Modi speaks at the farewell of 72 retiring Members of the Rajya Sabha pic.twitter.com/0LduuL4lHe
— ANI (@ANI) March 31, 2022
आज निरोप घेणार्या साथीदारांकडून आपण जे काही शिकलो आहोत त्याचा उपयोग करु. आज आपणही संकल्प करु की, या सदनातील पवित्र स्थानाचा उपयोग आपण समाजाला पुढे नेण्यासाठी नक्कीच करु जे देशाच्या समृद्धीसाठी उपयुक्त ठरेल. सध्या स्वातंत्र्याचा अमृतोत्सव सुरु आहे. आपल्या महापुरुषांनी देशासाठी खूप काही दिले, आता देण्याची जबाबदारी आपली आहे. आता तुम्ही मोकळ्या मनाने मोठ्या व्यासपीठावर जाऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला प्रेरित करण्यात हातभार लावू शकता असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.