जळोची – सेंद्रिय शेती उत्पादनांचे महत्त्व जगभर वाढत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे त्यांच्या उत्पादन व मार्केटिंग बाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरच राज्य सरकार व केंद्र सरकार बरोबर बैठक घेऊन सेंद्रिय शेतीला गती देणार आसल्याचे मत माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार यांनी व्यक्त केले.
कन्हेरी (बारामती) येथे महा अॉरगॕनिक ॲन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशन अर्थात मोर्फाच्या राज्यस्तरीय संचालक व जिल्हा अध्यक्षांच्या बैठकीत बोलताना वरील विचार पवार यांनी मांडले. यावेळी व्यासपीठावर मोर्फा चे तज्ञ संचालक युगेंद्रदादा पवार, अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, उपाध्यक्ष स्वाती शिंगाडे, सचिव प्रल्हादकाका वरे, माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, अतुल शहा, सुदामाआप्पा इंगळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोर्फाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी केले. त्यावेळी त्यांनी राज्यभरातील सेंद्रिय शेतीच्या अडचणी व मार्केटिंग साठी शासनाची मदत कशी आवश्यक आहे ते सांगितले.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यात काही तरी वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने घेतली जातात. तसेच ज्या फळपिकांना राज्यात जी,आय मानांकन मिळाले आहे, आशा पिकांवर लक्ष देउन त्या फळपिकांतील सेंद्रिय उत्पादनाबाबत आपण मोर्फाच्या माध्यमातून पुढाकार घेऊन प्रयत्न करावा. सेंद्रिय शेती मध्ये मातीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळे सर्वांनी जमीनीचे आरोग्य व जमीनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी प्रयत्न केले तरच सेंद्रिय शेती सोपी होऊ शकते.त्यामुळे यापुढे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोर्फा ने सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शकाची भुमिका वठवावी असा सल्ला ही पवार यांनी दिला.
जगभरात आरोग्याच्या दृष्टीने कमालीची जागृकता आली आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती उत्पादनांना भविष्यात मोठी मागणी वाढणार आहे, त्या दृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांनी सावध पावले उचलून सेंद्रिय शेती वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. सेंद्रिय शेतीच्या असलेल्या आपल्या अडचणीबाबत मी स्वतः मोर्फा पदाधिकार्यांचे समवेत राज्य व केंद्र सरकार कडे पाठपुरावा करणार असल्याचेही पवार यांनी बैठकीत सांगितले.
बैठकीत राज्यभरातून आलेल्या संचालकांना तज्ञ संचालक युगेंद्रदादा पवार यांनी मार्गदर्शन केले व मार्केटिंग बाबत आपण एकत्रित महाराष्ट्राचा ब्रँड करु असे सांगितले. यावेळी राज्यभरातील संचालक व जिल्हा अध्यक्षांनी आपापल्या भागातील सेंद्रिय उत्पादनाबाबतच्या अडचणी सांगितल्या.
यावेळी वसुधाताई सरदार, अमरजित जगताप, डाॅ राजेश कोकरे, बाळासाहेब घोरपडे, डॉ, प्रशांत नायकवडी, ॲड प्रकाश पाटिल, कल्याण काटे, नितीन तावरे, सुनिल मुखरे, संजय गावंडे, प्रल्हाद बोरगड, आनंद हुले, डाॅ गोवर्धन भुत्तेकर, राहुल रसाळ, सागर पाटिल, सुनिल ढवळे, हरिभाऊ यादव, योगेश रायते, विशाल पावडे, सौ सुरेखा जाधव, सौ नंदा भुजबळ, दिलीप पाटील, प्रशांत महाजन, गोकुळ पाटील, रविंद्र मेटकर, राजेश इंगळे, संजय दिघे, निशांत देशमुख, योगेश भोसले, प्रताप गावसकर, मोहन तुवर, संदिप डाकुळगे, सागर गायकवाड, निलेश जगधने,पुरूषोत्तम सोनोने सह राज्यभरातील मोर्फा चे प्रतिनिधी संचालक व जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते.