मुंबई : शिमग्याच्या सणासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर कोकणाकडे रवाना होतात, दरम्यान कमी पडत असलेल्या एसटीच्या गाड्यांना पर्यायी एसटी बसगाड्या रत्नागिरीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. खाजगी बसवाहकांनी प्रवाश्यांकडून जादा पैसे आकारून लूट करीत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांनी दिली.
कोकणाकडे जाणाऱ्या मुंबईकरांची खाजगी बसवाहक लूट करीत असल्याचे सदस्य भास्कर जाधव यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मांडले. यावर निवेदन करताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, एसटी बसगाड्या कमी पडत असतील तर इतर एसटीच्या बस गाड्या रत्नागिरीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. खाजगी प्रवासी वाहतूक करणारे बसवाहक प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे आकारत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांना देण्यात आले आहेत, असेही परिवहन मंत्र्यांनी सांगितले.