मुंबई – लोकलमधील वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याची तक्रार करणाऱ्या प्रवाशांवरच रेल्वेने कारवाई केल्याची अजब घटना मुंबईत घडली आहे. लोकल रेल्वेसेवा ही मुंबईची लाइफलाइन समजली जाते. पण सध्या उन्हाचा पारा वाढत असताना मंगळवारी लोकलमधील वातानुकूलित यंत्रणा बंद पडली.
यामुळे प्रवाशांनी त्याची रेल्वेकडे तक्रार केली. कल्याण स्थानकावर गोंधळ घातला. त्यावर रेल्वेने आपली चूक मान्य करण्याऐवजी एसीची तक्रार करणाऱ्या 2 प्रवाशांवरची कारवाई केली.
कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या सकाळच्या 8.45 च्या लोकलमध्ये हा प्रकार घडला. या घटनेनंतर प्रवाशी चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी दोन्ही प्रवाशांना नोटीस बजावून सोडून दिले.