जालना – ओव्हरटेक करताना अंदाज चुकल्याने पिकअपचा अपघात होऊन 20 जण जखमी झाले आहेत. तर 3 जणांची प्रकृति चिंताजनक आहे. जखमींवर अंबड ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत. ही घटना जालना-वडीगोद्री राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्रीजवळ शनिवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबड तालुक्यातील पिठोरी शिरसगाव येथील सय्यद कुंटुबातील एका मुलीचा शुक्रवार 11 मार्च रोजी विवाह सोहळा पार पडला होता. त्यानंतर आज कुटुंबातील मंडळी ओलिमासाठी बीड जिल्ह्यातील तिंतरवणी येथे पिकअपमधून जात होते. वडीगोद्रीजवळ एका वाहनाला ओव्हरटेक करत असताना चालकाला समोरील वाहनांचा अंदाज न आल्याने पिकअप रस्त्यावर उलटला. या घटनेत 20 जण जखमी झाले आहेत. तर 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना