सातारा – पश्चिम महाराष्ट्राला हदरवून टाकणारी घटना येथे घडली आहे . सातारा जिल्ह्यात एकाच दिवशी 5 जणांनी आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यात विविध भागात एकाच दिवशी पाच जणांनी आत्महत्या केली आहे. आत्महात्येमध्ये कौटुंबीक वाद आणि आजारपण अशी कारणं समोर आली आहेत.
आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 25 ते 40 वर्ष वयोगटातील लोकांचा सामावेश आहे. एकाच दिवशी पाच जणांनी गळफास लाऊन स्वतःचे आयुष्य संपवल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे.
आत्महात्येमध्ये कौटुंबीक वाद आणि आजारपण अशी कारणे समोर आली आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सातारा परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
कुठे घडल्या आत्महत्येच्या घटना?
वाई तालुक्यातील भुईंज येथील पोपट जनार्दन ढेडे यांनी वाईतील एमएसीबीच्या पाठिमागे असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कराड तालुक्यातील वडगाव हवेलीत सुमित सुरेश गायकवाड या युवकाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिसरी घटना कराड तालुक्यातील सुपने येथे घडली असून अमोल निवासराव पाटील राहणार सुपने यांनी एका जनावराच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.चौथी घटना पाटण तालुक्यातील विहे येथील असून गणपत जगन्नाथ कणसे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पाचवी घटना सातारा तालुक्यातील केडगाव येथे घडली असून अक्षय हिंदूराव इंगवले या युवकाने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. अक्षय हा पायाने अपंग असून नैराश्यातून हे पाऊल उचलले असल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली आहे.