बिहार – राज्याचे पोलीस महासंचालक एसके सिंघल यांनी इच्छेने लग्न करण्यावरून वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले, मुलींनी आज आपल्या इच्छेने लग्न केले तर त्यांना अनेक परिणामांना समोर जावे लागते.
#WATCH We’ve seen cases where girls left their homes for marriage without parents’ consent. Many of them get killed while others are forced into the flesh trade. It is parents who pay price for such decisions: Bihar DGP SK Singhal at ‘Samaj Sudhar Abhiyan’ event in Samastipur pic.twitter.com/wai9jNrnG1
— ANI (@ANI) December 30, 2021
अशा निर्णयांमुळे अनेक मुलींची हत्या केली जाते, तर अनेकांना वेश्याव्यवसायाला सामोरे जावे लागते.’ सध्या त्यांचा हा विडिओ सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार समाज सुधार अभियान राबवत आहेत. याच अभियान संदर्भातील कार्यक्रमात डीजीपींनी पालकांना आपल्या मुला-मुलींशी बोलत राहण्याचा सल्ला दिला. कुटुंबाच्या संमतीशिवाय मुलींचं लग्न होत असल्याबद्दल पोलीस महासंचालक एस.के.सिंघल यांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र त्यांचा या विधानाचा व्हिडियो सोशवर व्हायरल झाला असून नेटकरी त्यांचा या मतावरून भडकले आहे.